Wednesday, July 10, 2019

आठवण

आठवणीतला पाऊस

    आठवणीतला पाऊस  म्हणताक्षणी मला माझे बालपण आठवले आणि तोच खरा स्मृती पटलावरील पाऊस!  .लहानपणी सुट्टी पडली  की गावी(कोकण) जात असे.उन्हाळा संपत आला की मिरगवणीची तयारी  घरातील ज्येष्ठ मंडळी करत. सात जून मिरग सुरू-पाऊस येतलो तयारी करूक होई असे म्हणत तयारी सुरू आणि खरंच पाऊस  सात जून जूनच्या पहिल्या आठवड्यात येई.मिरग सुरू.!आम्ही लहान मुले ह्या पावसात मुक्तपणे भिजू आणि मग जेवणार मनसोक्त ताव ! निरागस बालपण ह्या मनातील पावसात मनसोक्तपणे विहरत असे.शेतकरी शेतात खोळ(  प्लॅस्टिकचा कागद) डोक्यावर घेऊन  शेतातील कामे करत.मुंबईला आल्यावर मग काय छत्री,रेनकोट घालून  शाळेत पालकांसोबत जात असे.गावचा-मुंबईचा पाऊस तोच! पण पाऊस अंगावर झेलण्याची पद्धत वेगळी!
     आठवणींतला पाऊस वेगळा तो काय?  सुखद अनुभूती घेता येणे,  बळीराजा शेतात जाऊन सर्वांच्या उदरभरणासाठी राबतोय आणि स्वतःही त्याचा आनंद घेतोय.
    मोठे झाल्यावर मनातला आठवणींतला  पाऊस आकाशातून जमिनीवर येत होता तशी चातकाप्रमाणे त्याची वाट बघतच असतो पण ह्या पावसात एक अवखळ अदा असते.मनाची हाक असते,कुणाची तरी वाट पाहत त्याच्यासोबत भिजण्याची आस मनाला गारवा देते.प्रियकर-प्रेयसी हा पाऊस तनामनात झेलत प्रेमात अखंड भिजून जातात .हा पाऊस ओलावा कायम स्मृती पटलावर असतो.
    आठवणींतला पाऊस सुखकारक,जीवनदायी,सृजना ची निर्मिती करणारा  असतो.अर्थात प्रत्यक्षात त्याचे स्वरूप बदलले.त्याला कारण आपण माणसेच!   पाऊस लांबला,मिरगाची मिरगवणी दुरापास्त झाली .असे असले तरी  अजूनही वेळ गेली नाही आपल्या मनातील सुखकारक, जीवनदायिनी मृगसरी नक्की बरसतील!
     आपण पाणी अडवून जिरवूया,वृक्षारोपण-संवर्धन करूया ,प्राणी पक्षी निवारे संवर्धन करुनी मोराला नाच  रे मोरा आंब्याच्या वनात त्यासाठी वन जंगल सुरक्षित करूया म्हणून मनातील पाऊस वास्तवात नक्की येईल.
     आनंदाचा परमानंद तू
      वसुंधरेचा ध्यास तू
      मनीची आस तू
      आठवणीतला पाऊस तू!

No comments:

Post a Comment